राज्यात बनावट मद्याचा सुळसुळाट   

तीन महिन्यात ५६ कोटीची बनावट दारु जप्त

मुंबई : राज्यात बनावट मद्य  विक्री आणि वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली असून, राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या  कृती कार्यक्रमाच्या अहवालानुसार माहितीनुसार बनावट मद्य विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ३७. ४९ टक्क्यांनी वाढ झाल्याची  माहिती पुढे आली आहे.  या काळात राज्यात ५६ कोटी ४८ लाख रुपयांची बनावट दारु जप्त करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.
 
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम दिला होता. राज्य सरकारच्या महसुलाचा कणा समजल्या जाणा-या अबकारी शुल्क विभागाने १०० दिवसांमध्ये कोणती कामे केली त्याचा सद्यस्थितीचा अहवाल सादर केला आहे.या कृती आराखड्यामध्ये राज्यातील अवैध मद्य धंद्यावरील कारवाईत वाढ करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ही कारवाई करण्यास या विभागाला यश आले आहे. अवैध मद्य विक्री करणा-यांच्या विरोधात १ जानेवारी ते १५ एप्रिल या काळात रारबलेल्या कारवाईत तब्बल २१ हजार ११८ गुन्हे दाखल करण्यात आले. तर मागील वर्षीच्या तुलनेत अवैध मद्य विक्रीच्या गुन्ह्यात ३७. ४९ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधी तब्बल ५६ कोटी ४८ लाख रुपयांची बनावट दारु जप्त करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.

टँकरवर टिजिटल लाँकर

राज्यात मद्यार्काची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि चोरीही होते. एखाद्या टँकरमधून मद्यार्क नेताना मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना होतात. त्यामुळे मद्यार्क आणि मद्य वाहतूक करणार्‍या वाहनांवर डिजिटल लाँक किंवा ई लाँक बसवण्याचे सक्तीचे केले आहे.

१०० दिवसात १०० अड्डे बंद

हातभट्टी गावठी दारु निर्मिती आणि विक्री हा व्यवसाय पूर्णपणे बेकायदा असून यामुळे नागरिकांच्या जीवाला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०० दिवसात हातभट्टीचे १०० अड्डे बंद करण्याचे उदिदष्ट ठेवले होते. त्यानुसार या कालावधीत ११२ हातभट्ट्या आणि १८१ दारुचे गुत्ते बंद करण्यात आले. विना परवाना मद्य व्यवसाय करणे गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles